सोमवार, २४ ऑक्टोबर, २०११

सुगंधी माती - निरंजन उजगरे

आपलं वय म्हणजे
आपल्याला दिसलेल्या नव्हे तर,
उमजलेल्या पावसाळ्य़ांचं गणित असतं;
ज्याच्या उत्तरातून सूर धरतं
आयुष्याचं पाऊसगाणं...

एखाद्याशी आपलं नातं,
एकत्र असताना जे वाटतं त्याहून
दूर गेल्यावर जे वाटतं तेच असतं...

आपल्या मावळतीच्या प्रवासापर्यंत
रुजत जातात आपल्या आत आत
हीच पाऊसगाणी, हीच नाती’
नंतर उरते
फक्त सुगंधी माती...