सोमवार, २ ऑगस्ट, २०१०

माझी आई - नारायण सुर्वे

जेव्हा तारे विझू लागत
उंच भोंगे वाजू लागत
पोंग्याच्या दिशेने वळत
रोज दिंड्या जात चालत
झपाझप उचलीत पाय
मागे वळून बघीत जाय
ममतेने जाई सांगत
नका बसू कुणाशी भांडत
वर दोन पैसे मिळत.

दसऱ्याच्या आदल्या दिनी
जाई पाचांसह घेऊनी
फिरू आम्ही आरास बघत
साऱ्या खात्यांतून हुंदडत
किती मजा म्हणून सांगू
शब्दासाठे झालेत पंगू
भिंगऱ्या पेपेटे घेऊन
फुग्यांचे पतंग झोकून
जात असू पक्षी होऊन.

एक दिवस काय झाले
तिला गाडीतून आणले
होते तिचे उघडे डोळे
तोंडातून रक्त भळभळे
जोडीवालीण तिची साळू
जवळ घेत म्हणाली बाळू
मिटीमिटी पाहात होतो
माझे छत्र शोधीत होतो
आम्ही आई शोधीत होतो.

त्याच रात्री आम्ही पांचानी
एकमेकास बिलगूनी
आईची मायाच समजून
घेतली चादर ओढून
आधीचे नव्हतेच काही
आता आई देखील नाही
अश्रूंना घालीत अडसर
जागत होतो रात्रभर
झालो पुरते कलंदर.

१० टिप्पण्या:

deepak म्हणाले...

mazi aae

sanju म्हणाले...

खूप छान लेख आवडला सुर्वे सर हे एक प्रत्यक्ष देवाने पाठविलेले देवदूतच होते. अन्यथा समाजात अशा प्रकारची वैचारिक.भावनिक आणि सामाजिक क्रांती घडवणे सोपी गोष्ट नाही अशा या लोकभिमुख महाकवीला माझा सलाम .......................

व्याख्याते नवनीत यशवंतराव म्हणाले...

छान

Simran Joshi म्हणाले...

खूप मस्त कविता आहे ही. मला फार आवडली.

Unknown म्हणाले...

खूप छान कविता आहे.

Unknown म्हणाले...

Very emotional I like most.....😢😢😢

bhavesh ingale म्हणाले...

sir mala khup aavadli kavita. Mazhya aaichi athvan aali.

Unknown म्हणाले...

ही कविता वाचत असताना डोळे पाणावल्याशिवाय राहिले नाही...खरोखर अतिशय ह्रिदयस्पर्षी लेखन....!!👌😢

Ayub Attar म्हणाले...

😢😢😢😢

Unknown म्हणाले...

नारायण सुर्वे यांची कविता थेट ह्रदयाशी संवाद साधते.