गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०११

किती पायी लागू तुझ्या - बा.सी.मर्ढेकर

किती पायी लागू तुझ्या
किती आठवू गा तूंते
किती शब्द बनवू गा
अब्द अब्द मनी येते

काय गा म्या पामराने
खरडावी बाराखडी
आणि बोलावी उत्तरे
टिनपट वा चोमडी

कधी लागेल गा नख
तुझे माझिया गळ्याला
आणि सामर्थ्याचा स्वर
माझिया गा व्यंजनाला !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: